आमचं एक प्रकरण होत जमिनी बाबत च .
माझे वडील पकडून ५ भाऊ आणि २ बहिणी आहेत.
१) हरिभाऊ अण्णा भंडलकर
२) लाला अण्णा भंडलकर
३) ज्ञानदेव् अण्णा भंडलकर
४) नामदेव् अण्णा भंडलकर
५ ) कांतीलाल अण्णा भंडलकर
६) सखूबाई
७) बायडाबाई
५ भावांना आजोबांनी जमीन दिली होती त्यापैकी गट नं २३६ गाव - कोऱ्हाळे खुर्द . ता. बारामती क्षेत्र १ हेक्टर १६ आर ही अनुक्रमे ३ ४ ५ नं च्या भावांना दिली होती. आणी गट नं ९६ गाव - सस्तेवाडी त्या पैकी ३५ आर क्षेत्र हे १ नं म्हणजे माझ्या वडिलांना दिले होते आणी गट नं ८६ मधील २९ आर हे क्षेत्र २ नं च्या भावाला दिले होते आता हे सदर वाटप आजोबांनी त्या काळी पंचा समक्ष केले होते . आता सर्व जमिनी वर सगळे वारस वैगेरे लागून १६ नाव आहेत .
आता ह्यापैकी लाला नामदेव कांतीलाल आणि बायडा बाई ह्या वारल्या आहेत. आता ह्यात माझा चुलत भाऊ राजेंद्र कांतीलाल् भंडलकर .कांतीलाल ह्यांचा मुलगा ह्यांने माझ्या वडिलांच्या गट नं ९६ मधील काही क्षेत्र आणी लाला भंडलकर ह्याच्या गट नं ६८ मधील काही क्षेत्र परस्पर बाहेरील व्यक्तींना विकले आहे म्हणजे त्याचे खरेदीखत केले आहे. आता त्यांनी हे करताना बाकीच्या आमच्या सहीसेदारांची परवानगी घेतली नाही . आता हे जो खरेदी खत करत असतो दुय्यम निबंधक अधिकारी त्यांना पण माझ्या वडिलांनी सांगतील की सदर जमिनीत सगळे १६ नाव आहेत हे अस करू नका म्हणून तरी पण त्या अधिकाऱ्याने हे अस केल आहे .पुढे आम्ही कोर्ट मध्ये दावा दाखल केला आहे. गावाचा जो तलाठी आणी मंडल् अधिकारी असतो त्यांना पण तक्रार दिल्या आहेत. आता आमच म्हणणं एवढंच आहे .ह्याची नोंद ७/१२ सदरी होऊ नये म्हणून . आता ह्यात आम्ही हिकडे शिरूरला असतो त्यामुळे पप्पानी करार करून जमिनी वाट्याने करायला दिली आहे त्यांचं नाव दिलीप गायकवाड . आणी ज्याने विकत घेतली त्याच नाव विकास जाधव.विकास जाधव ह्या व्यक्ति ने बऱ्याच लोकांच्या अशा गुंता गुंता च्या जमिनी लुबाडल्या आहेत. हा व्यक्ती काही दिवसापूर्वी आम्ही ज्याला वाट्याने दिली आहे दिलीप गायकवाड ह्यांना नांगरनी करत असताना अडवा आला होता तो म्हणत होता हे माझं एवढं क्षेत्र ह्यातल तेवढं सोडून नांगर .तर आम्ही मग पोलीस स्टेशन ला गेलो तिथे त्याला आम्ही म्हंटल तुझ ७/१२ वर नाव नाही तुझा ह्यात संबंध नाही म्हणून .पण तो आता माझ्या चुलत भावाला म्हणजे राजेंद्र कांतीलाल भंडलकर पुढे करून् आमच्या वाटेकरू ह्यांना दमदाटी करत आहे. हे असे बेकायदेशीर खरेदी खत महाराष्ट्र मध्ये भरपूर होत आहेत .त्या बाबत न्याय मागायचा आहे. आता ही जी गोष्ट घडली ती आमच्या वाटेकरू नी आम्हाला सांगितली .आम्ही वाट्याने नसती दिली तर त्या व्यक्तीचे ७/१२ वर नाव पण आले असते . हा जो जमिनी बाबतचा काळा धंदा लोकांकडून चालला आहे . साहेब् सदर राजेंद्र भंडलकर ह्याने मंडल् अधिकारी ह्यांना दवाखान्यासाठी विकली असे खोटे करण दिले आहे .त्याला कोऱ्हाळे खुर्द गावात त्यांना जमीन आहे त्यांनी तिथे शेती केली आहे त्यांचा कारखान्याला उस पण गेला आहे त्या जमिनीतून .त्यांनी मुद्दाम माझ्या वडिलांना आणी माझ्या चुलत्याचा जमिनीचा खरेदी दस्त केला आहे.त्यानी कोणा ही इतर जनांना सांगितली नाही ही गोष्ट .आता प्रांत साहेबां कडे ही केस आहे .न्याय मिळेल का आम्हाला