माझ्या आईने वडीलोपार्जीत मिळकत वाटप होऊन मिळणेबाबतचा दावा २००६ मध्ये दाखल केलेला आहे. आईची आई मयत असून तिला सावत्र आई आहे. आता आईचे वडील हे मयत झालेले असून माझी आई त्यांची एकमेव वारस आहे. तथापी सदर वाद सुरु असताना आईच्या वडीलांनी जमीन आईला मिळू नये म्हणून सदर मिळकत सावत्र आईच्या मयत मुलीची त्यांच्या जवळ राहत असलेल्या मुलीच्या ( नात) व तिचा नवरा( घरजावई) यांच्या नावावर अनेक व्यक्तींच्या नावावरून फिरवून फिरवून केलेली आहे. तरी याबाबत आपले मार्गदर्शन व्हावे, हि विनंती.