[Login to see the link]
परागंदा असलेल्या व्यक्तीच्या वारसाची नोंद
वाचा : भारतीय वारस कायदा १९२५ ; भारतीय पुरावा कायदा १८७२ कलम १०७, १०८ ; महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १४९, १५०.
समज : अनेक वर्ष बेपत्ता असलेल्या व्यक्तीच्या वारसांची नोंद तलाठी करू शकतात.
कायदा: भारतीय पुरावा कायदा, १८७२ च्या कलम १०७, १०८ अन्वये अनेक वर्षे परागंदा असलेल्या आणि ज्याचा ठावठिकाणा किंवा बातमी मिळून येत नाही अशा व्यक्तीचे वारस दिवाणी न्यायालयामार्फत ठरविले जातात.
दिवाणी न्यायालयातून प्राप्त केलेला वारस दाखला आणि प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतर गाव दप्तरी बेपत्ता असलेल्या व्यक्तीच्या वारसांची नोंद करता येते.